शनिवार, ३१ मे, २०२५

चला छंद जोपासूया..

🌹चला छंद जोपासूया.... आपलं मानसशास्त्र फुलवूया 🌹
     राकेश वरपे सर यांचे फेसबुक वरील हे दोन ग्रुप खूपच कौतुकास्पद आहेत.कारण यामुळे समाज विधायक असं कार्य उत्तमरित्या घडतं आहे.अनेक समुपदेशक, मानसशास्त्र प्रेमी आपापल्या परीनं समाजातील मानसिक विकृतींवर प्रकाश टाकत आहेत.आणि विविध छंद जोपासण्याची प्रेरणा देऊन अनेक सामाजिक विकृती कशा कमी होतील?माणूस आनंदी कसा बनेल? यासाठी प्रयत्न करणारे हे दोन्ही ग्रुप आहेत.यातील सर्व मेंबर एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे समाज जागृतीचं काम करीत आहेत.ही खरंच खूप मोठी समाजसेवा आहे.कारण सुंदर जगण्याचं गमक मानसशास्त्रातच आहे.पण त्याकडेच दुर्लक्ष होऊन माणूस सुंदर जीवनाला नैराश्याच्या खाईत लोटतो.यातून माणसाला बाहेर काढण्याचं काम मानसशास्त्र आणि त्याचे छंद करीत असतात.म्हणूनच हा सहसंबंध समजून घेऊन जीवन सोपं करुया.
     खरं तर अज्ञानामुळे माणूस अंधारात भटकतो.पण मानसिक आरोग्य, मनाचं कार्य, घटना आणि मानसशास्त्र यांचा सहसंबंध हे समजून घेतलं तर माणूस हे जीवन सहजपणे जगू शकतो.आपले छंद आणि आपलं मानसशास्त्र यांचा सहसंबंध खूप जवळचा आहे.आपले छंद आपणास आनंद देतात.एकट असलं तरी एकाकी वाटू देत नाहीत.आपले छंद आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.म्हणूनच प्रत्येकाने आपले वेगवेगळे छंद सतत जोपासत राहिलं पाहिजे.जीवनात गरजेइतका पैसा आणि छंद सोबत असले कि आयुष्याचा उत्सव नक्कीच बनवता येतो.जीवनात आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवता येतो.अंगणात बसून आकाशातील चंद्र देखील  आनंदाचा प्रकाश तुमच्या मनात पेरतो.आजूबाजूचा सुंदर निसर्ग तुम्हाला जगणं शिकवतो.बस्स!तशी नजर हवी.निरिक्षण हवं.मग आयुष्य फक्त सुंदर वाटेल.अति अपेक्षा आपणांस आपल्या छंदांपासून दूर नेतात.मग माणूस नैराश्यात अडकत जातो.यातून आपणचं आपणास बाहेर काढू शकतो.इतर लोक फक्त मार्ग दाखवू शकतात.चालायच तर आपणच असतं.म्हणूनच जेव्हा जेव्हा नैराश्यात मन अडकू पाहत तेव्हा तेव्हा आपले छंद आठवावेत.ते जोपासावेत.त्यामुळे आपलं मन कलाटणी घेतं.प्रत्येक माणसांत काही तरी छंद असतातच.हे काळाच्या ओघात मागे पडत जातात.पण ते वेळोवेळी जोपासत रहावं.त्यामुळे मानवी मन,त्याच आरोग्य उत्तम राहू शकत.प्रत्येक गोष्ट, घटना यामागचं मानसशास्त्र प्रत्येकाला समजू लागलं तर नक्कीच जगण्याचे मार्ग सुकर होतील.म्हणूनच आपले छंद आणि आपलं मानसशास्त्र यांचा सहसंबंध लक्षात घेऊन आपले छंद जोपासा आणि हे जीवन सुंदर बनवा.खरचं "कसली ही दु:खं! किरकोळ तक्रारी साऱ्या!"
सौ.सुधा पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती..     बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...